🔥 TRENDING Mirzapur: The Movie launches lyrical v... FTPCCI and EAGLE Announce Drug-Free In... Hindustan Coca‑Cola Beverages to inves... Andhra Pradesh Announces New Land Refo... Karnataka Rejects Kasturirangan Report... Applied Materials to invest Rs 3,600 c...
16 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
National

ठाणे-मुरबाडकरांसाठी मोठी बातमी! ३५ हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला मंजुरी; ११ तासांचा प्रवास अवघ्या ४ तासांत

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 15 Sep 2026, 12:38 AM 👁 37
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
🛣️दिनांक १५/०९/२०२६.ठाणे/मुरबाड:महाराष्ट्र सरकारने राज्यातील दळणवळण यंत्रणेला वेग देण्यासाठी आणि मुंबई महानगर प्रदेशाला थेट मराठवाड्याशी जोडण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि कल्याण परिसराला थेट मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्याशी जोडणाऱ्या कल्याण-लातूर एक्सप्रेसवे (Kalyan–Latur Expressway) या प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी महामार्गाचे नाव 'जनकल्याण एक्सप्रेसवे' (Jankalyan Expressway) असे ठेवण्यात आले आहे.या प्रकल्पामुळे ठाणे जिल्हा, विशेषतः कल्याण आणि मुरबाड परिसरातील नागरिकांसाठी मराठवाड्याचा प्रवास कमालीचा वेगवान आणि सुकर होणार आहे.🏔️ धोकादायक माळशेज घाटाला 'बायपास'; मुरबाडनजीक होणार ८ किमीचा भव्य बोगदामुरबाड आणि कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे या महामार्गामुळे धोकादायक माळशेज घाट पूर्णपणे बायपास होणार आहे.पावसाळ्यात माळशेज घाटात वारंवार होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटना आणि अवघड वळणांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो व जीवही धोक्यात येतो. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पर्वतरांगांमधून थेट ८ किलोमीटर लांबीचा भव्य बोगदा (Tunnel) तयार केला जाणार आहे. हा बोगदा मुरबाड परिसरापुढील घाटातील प्रवास अत्यंत सुरक्षित आणि विनाअडथळा करेल.📊 जनकल्याण एक्सप्रेसवे: प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्येमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) देखरेखीखाली हा प्रकल्प राबवला जात असून याची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:रचना आणि लांबी: हा मार्ग पूर्णपणे 'ॲक्सेस कंट्रोल्ड' (प्रवेश नियंत्रित) असून ६ पदरी (6-Lane) ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे असेल. याची एकूण लांबी सुमारे ४४२ ते ४५० किलोमीटर आहे.जोडणारे जिल्हे: हा एक्सप्रेसवे ठाणे (कल्याण/मुरबाड मार्ग), अहिल्यानगर (अहमदनगर), बीड, धाराशिव आणि लातूर या ५ ते ६ प्रमुख जिल्ह्यांना थेट जोडणार आहे.प्रचंड गुंतवणूक: या संपूर्ण मेगा प्रकल्पासाठी अंदाजे ३५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.कनेक्टिव्हिटी: हा मार्ग भविष्यातील विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडोरला जोडला जाणार असल्याने, ठाणे जिल्ह्यातील अंतर्गत शहरांना याचा प्रचंड आर्थिक फायदा होईल.⏱️ वेळेची मोठी बचत: ११ तासांऐवजी फक्त ४ तास!सध्या ठाणे, कल्याण किंवा मुरबाडवरून रस्ते मार्गे लातूर किंवा बीडकडे जाण्यासाठी प्रवाशांना साधारणपणे १० ते ११ तास प्रवास करावा लागतो. जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले.
सिटीझन रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
📲Get App