मौसम
महाराष्ट्रात मान्सून परतीचा प्रवास २५‑२८ सप्टेंबर दरम्यान सुरू होईल, IMD ने दिला अंदाज
यहाँ देखें:
▶️ YouTube
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की मान्सून १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरायला सुरुवात करेल आणि महाराष्ट्रात २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान परतीचा प्रवास सुरू होईल.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार मान्सून १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरायला सुरुवात करेल. महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या मोसमात देशात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी म्हणजेच केवळ ८४ टक्के पाऊस पडल्यामुळे देशाच्या ३९ टक्के भू-भागावर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्याच्या हवामान स्थितीचा विचार करता, नैऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या दिशेने सरकले असून, गुजरातमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
याशिवाय, वायव्य बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा तसेच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती अजूनही कायम आहे.
या मोसमात देशात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी म्हणजेच केवळ ८४ टक्के पाऊस पडल्यामुळे देशाच्या ३९ टक्के भू-भागावर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्याच्या हवामान स्थितीचा विचार करता, नैऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या दिशेने सरकले असून, गुजरातमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
याशिवाय, वायव्य बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा तसेच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती अजूनही कायम आहे.