🔥 TRENDING Kuki‑Zo Council Turns Down Call for NR... Manipur Assembly Term Could End Early... Assam Cab Operators End Blockade After... Ten youths from Rupohihat return to As... Meghalaya taxi bodies withdraw planned... Person Charged for Cutting Government...
24 Aug 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

भोकरदनमध्ये मिरचीचे भाव गडगडले; शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

✍️ Reporter: Vishnu Pawar 🗓 24 Aug 2026, 12:48 AM 👁 16
Watch on: 📷 Instagram
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मिरचीला केवळ १५ ते २० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मिरची उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारात मिरचीला मिळणाऱ्या अत्यंत कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

सध्या भोकरदन बाजारपेठेत मिरचीला १५ ते २० रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. मिरची लागवडीसाठी आणि मजुरीसाठी एका शेतकऱ्याचा चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. मात्र, सध्याच्या बाजारभावामुळे हा खर्च निघणेही कठीण झाले आहे.

उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे परिसरातील मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत असून, त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
📲Get App